Saturday, December 18, 2010

सल्ला


                            विजय रात्रीच्या वेळी निघाला होता. गाव अजून दूर होते. झपाझप झपाझप पाऊले पडत होती ... जणू काही जमिनीवरून नुकताच कात टाकलेला साप जात होता. किर्र रात्र, आवाज केल्याशिवाय ऐकू येणार नव्हता अशी वेळ. कदाचित याचीच भीती पाउलांना होती म्हणून मध्ये मध्ये पाला पाचोळा उडवून साथीचा दिलासा स्वतालाच देत होती. विजयाला काही सुचत नव्हते कुणी तरी त्याचा पाठलाग करत aahe असे त्याला निघाल्या पासून वाटत होते. मागे वळून बघायची भीती वाटत होती, म्हणून शबनम मध्ये असलेला आरसा मध्ये मध्ये समोर घेऊन मागे कुणी आहे का हे बघायचा.
                            एवढ्या कडकाच्या थंडीत पण त्याला घाम घाम फुटला. मनाच्या कल्पनेची शक्ती शरीराच्या शक्ती पेक्षा कैक पतीने जास्त असल्याचा हाच एक पुरावा होता. तो जितका जोरात चालत होता तितकेच मन मात्र गावी पोचून कधी एकदा शरीर येते आणि ते झोपते असे झाले होते. वेळ पुढे जात होती, पाला पाचोळा पण साथ देई नासा झाला. पावला मध्ये आता मातीची ढेकळ लागत होती आणि फुटत होती. क्षण भर त्याला फाटत आहेय का फुटत आहे हेच कला नव्हते. त्याचा वेग यामुळे मंदावला. कधी पासून तो याच संधीची वाट बघत होता. विजयाला एका आवाजाचा भास झाला. त्याने आरसा उचलला आणि प्रयत्न केला मागे काही आहे का बघण्याचा..... आरशात बघितले तर मागे त्याला ओलसर काही तरी दिसले. त्याला धडकीच भरली. रडावेसे वाटत होते पण, वय आणि विजन शांतता ते होऊ देत नव्हते. त्याने रुमाल काढला आणि चेरा पुसला. आता मात्र आरशात स्पष्ट मागचे दिसायला लागले. मागे तेव्हा तरी काहीच नव्हते. रुमाल मात्र ओलाचिंब झाला होता. ढेकळ पण संपली होती. पुन्हा एकदा त्याला वेग सापडला.
                               अंधाराने आता पूर्ण काळी घोंगडी पांघरली. विजयाचा धीर सुटायला लागला. त्याने ठरवले कुठेतरी विसावा घ्यावा. तो योग्य जागेची वाट बघत जात होता. तेवढ्यात एक वटवाघूळ ओरडत जवळून गेले. ढास !!! त्याला यमदूत बघून गेल्याच भास झाला. मागे न बघतच त्याला लक्षात आता वटवाघूळ काहीतरी दिसले नि ते जमिनीवर पडले. त्याला पहिल्यांदा वटवाघूळ सरळ आडवे झालेले दिसले. आता मात्र विजयची नजर वायू वेगाने आधार शोधायला लागली. भुकेल्याला आणि भीतीला देवाने तीक्ष्ण कानांचे वरदान दिलेले असते असे म्हणतात. लांब कुठे तरी कुत्रे भून्क्लेले त्याने ऐकले आणि तो जवळ पास पळतच निघाला. त्याला कुत्राची पण भीती या वेळी छोटी वाटत होती 


                              हळू हळू कुत्र्याचा आवाज जवळ आला. या आवाजामुळे त्याला जिवंत असल्या सारखे वाटले. इतर वेळेला मार्ग बदलणारा विजय आज कुत्र्याच्या दिशेने जात असलेला बघून, कदाचित तो श्वान भुंकत नसून हसत आहे असेच नियतीला वाटले असेल. आज विजयची खात्री पटली माणूस हा प्राणीच आहे. संगत नसेल तर आयुष्याची पंचापाक्वन्नाची पंगत पण उकीरड्या सारखी वाटते. तिथे एक मंदिरासारखे दिसले. विजयाला आता त्या श्वानात साक्षात गुरु भेटल्याचा आनंद झाला नि भीती पळून गेली.
                                 तो पायऱ्या चढून मंदिराच्या आवारात गेला आणि पहुडला. पायांची यंत्रे थांबल्याने त्याचा डोळा हळू हळू लागायला लागला आणि तेवढ्यात ........... त्याला कुत्र्याची आर्त किंकाळी ऐकू आली आणि तो घाबरून उतला आणि त्या कुत्र्याच्या दिशेने पाळला पण मंदिराची शेवटची पायरी ओलांडायचे धाडस त्याच्या मध्ये नव्हते. ते कुत्रे केविळवाणे आवाज काढत मरता मरता विजय कडे बघत शेवटचे ओरडले. आता मात्र विजयाचा ताबा गेला आणि तो ढसाढसा रडायला लागला. त्या अंधाऱ्या जगात कुत्रा क्षणभर नाते निभावून गेला. विजय थरथर कापायला लागला आणि तो गाभाऱ्याच्या दिशेने पळाला. तो दार उघडणार तोच दारानेच वाऱ्याच्या मदतीने त्याला वाट दिली. तो धापा टाकत आत एका दगडावर आपटला आणि तिथे एक पाटी दिसली - ' हि जागा नियोजित दशक्रियाविधीकरता राखीव आहे. तरी याचा वापर विश्रामाकरता करू नये. ' विजयचे डोळे भिरभिरायला लागले आणि त्याला अजून एक पाटी दिसली. - 'सल्ला ऐकला असता तर .........' आणि तर शब्दातील र ची रेघ फरफटत खालपर्यंत आली होती. जणू कोणी मरणप्राय वेदनेने सांगत होते - ''सल्ला ऐकला असता तर ......... '.  त्याला त्याचा बोध झाला नाही पण त्याने तो बाधला. त्याने ठरविले कि इथून पळायचे.
                                     तो जोरात सुटला, चालत म्हणा किंवा पळत म्हणा. त्याला लहानपणापासून जेवढी स्तोत्रे येत होती तेवढी तो मोठ्याने म्हणत निघाला. पहिल्यांदा त्याला बरे वाटले, पण नंतर तो स्वताच्याच आवाजाला घाबरायला लागला. अजून अंधार गुडूप होतेच. त्याच्या वेगामुळे त्याला गावाकडे जाण्यापेक्षा जणू गावच इकडे येत येत असल्याचा भास होत होता. जसे पाय हवेत आहेत नि जमीन जोरात मागे सरकती आहे. एवढ्या वेळच्या अथक भीतीपोटी तो दमला होता शरीराने पण आणि मनाने तर जास्तच.
                                    त्या डोळ्यावर झापड होती. माणसाला जेव्हा अशी झापड येते, तेव्हा अनुभव मात्र डोळ्या समोर नंगा नाच करत असतो. त्याला कळलेच नाही तो कधी झोपला आणि त्याने डोळे उघडले तेव्हा त्यांनी बायको त्याच्या डोक्यावरची दुधाची पट्टी बदलत होती. ती म्हणाली - 'धनी एवढ्या तापत कशाला यायचे. कुठे तरी आराम करायचा'.  त्याने तापतच सगळा अनुभव तिला सांगितला पण त्या अर्धवट पाटी बद्दल तो काही नाही बोलला. राहून राहून त्याच्या नजरे समोर ''सल्ला ऐकला असता तर .........' हीच अक्षरे पुन्हा पुन्हा दिसत होती. आता बायकोला ऐकून घाम फुटला. तिने प्रेमाने धन्याला भाळी चुंबन दिले आणि  म्हणाली त्यापेक्षा माझा सकाळीच येण्याचा 'सल्ला ऐकला असता तर ..........'. आणि पुन्हा विजयाला  भोवळ आली.

============================================
Vijay Albal

Thursday, December 16, 2010

खजिना (भाग ९) - शेवट

(Please don't read if you haven't read earlier 8 parts.)


       आता फक्त खजिना शोधणं एवढच बाकी राहीलं होतं. त्याच्या मार्गातला काटा तर संपल्यातच जमा होता. तो त्या सापाला दोरीसारखं गळ्यात अडकवुन तसाच पळत जिन्याकडे आला. ही बातमी कधी एकदा निशाला सांगतो असे त्याला झालं होतं. अगदी धावतच तो जिना चढायला लागला. निशा त्याच्याकडे वेड्यासारखी बघत अगदी पहिल्याच पायरीवर उभी होती.कुमार दाणदाण जिने चढत तिच्य़ा जवळच्या पायरीपर्यंत आला आणि "धडाड........." असा मोठा आवाज शांतता उध्वस्त करत गेला. निशाला फक्त धुळीचा लोट दिसला.

       त्या खचलेल्या पायऱ्यांनीच घात केला होता. आधिच मोडकळीला आलेल्या पायऱ्यांनी त्याच्या धावत चढण्याने नेमक त्याच वेळी जीव टाकला होता. तो अवजड दगडी जिना त्याच्यासकट धाडधाड कोसळला. तो त्या दगडांखाली पुरता चिरडला गेला. तिच्या हाकेला साद न आल्यामुळे तीचं तर अवसानच गळुन पडलं. ती धुळ हळुहळु खाली बसली तसं तिच्य़ासमोरचं चित्र स्पष्ट दिसु लागलं. तिची शेवटची आशा असलेला कुमार दगडाच्या जिन्याखाली ठेचुन अस्ताव्यस्त पडला होता. ती सावकाश त्या उरलेल्या एकाच पायरीवरुन मागे फिरली. नकळतच तिची पावलं तिच्या खोलीकडे वळाली. तो छिन्न विछिन्न देह तिच्या नजरेसमोरुन जात नव्हता. टेबलवर पडलेली पर्स उघडुन तिने मोबाईल काढला. नंबर दाबुन तिने फोन कानाला लावला.

"हॅलो बादशहा...मी निशा बोलतेय"
"हॅलो मेरी जान. सब कुछ ठीक ना. इस टाईम कायको फोन किया. त्याला शक येईल ना" पलीकडुन आवाज आला.
"सगळा खेळ खल्लास झालाय...हो ..अपघातच झालाय. इतका वेळ खर्चुन आपल्याला काहीच मिळालं नाही.
अं...नाही नाही. खजिन्यापर्यंत तर पोहचलोच नाही अजुन.
काय? आजची रात्र प्रयत्न करु म्हणतोस?
पण लगेच निघ रे मग.
इथे मुर्दाघरात मी जास्त वेळ एकटी नाही राहु शकत.
नाही नाही...फक्त आजची रात्रच. उद्या सकाळी बोंबाबोंब होणार आणि मग संपलच सगळं."

"आलोच मी दोन तासात. बाय." पलीकडुन फोन कट झाला.

       निशाने फोन ठेवला. तळघरात आता कसं उतरायचं आणि तो खजिना नेमका शोधायचा तरी कुठे..हेच विचारचक्र तिच्या डोक्यात सुरु होतं. तळघरातल्या नागाची तर आता काहीच भिती उरली नव्हती. पण या नादातच तिच्य़ा पायाजवळ सळसळ करत आलेली नागिण तीला दिसलीच नाही.
मघापासुन सगळं घडलंच इतक्या अचानक होतं की........ निर्मलाबाईंनी बऱ्याच वेळापुर्वी मानवी देह सोडलाय हे ती विसरुनच गेली होती.

********************************
समाप्त

-योगेश भागवत.

Monday, December 13, 2010

खजिना (भाग ८ ) - कौल


       कुमार आता सर्व पायऱ्या उतरुन तळघरात पोहचला होता. त्याने त्याच्या हातातलं बोचकं खाली ठेवलं. निशा सुद्धा त्याच्या मागे येऊन त्याला बिलगुन उभि राहीली.तीच्य़ा छातीतली धडधड त्याला स्पष्ट ऐकु येत होती. त्या कुबड वासात जास्त वेळ थांबणं त्याला शक्य नव्हतं . त्यानं खाली वाकुन पोत्याचं तोंड सोडलं. चारही पाय आणी तोंड करकचुन बांधलेल्या मुंगुसाला त्याने बाहेर काढलं. मुंगुसाला बंधनातुन मोकळं करुन तो पुन्हा जिना चढुन वर जायला लागला. निशा तर फक्त भारल्यासारखी त्याच्या मागे चालत होती.

       कुमारने कपाळावरचा घाम एकदा निथळला आणि तो खुर्चीत बसला. एक मोठं काम केल्यानंतरचा थकवा त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होता. निर्मलाबाईंच्या धडपडीने त्याची तंद्री अचानक तुटली आणि तो त्यांच्या खोलीकडे पळाला. निशाने तर जाणुनबुजुन तिकडे दुर्लक्ष केलं. ती तशीच बसुन राहीली. निर्मलाबाईंची शेवटची धडपड चालु होती. त्यांना श्वास घेणं सुद्धा जड झालं होतं. त्यांना तशा अवस्थेत बघुन कुमारचा द्वेष अजुनच उफाळुन आला.

"मर म्हातारे आता तु....मला प्रॉपर्टी देत नाहीस काय़? तुला काय वाटलं..मी काय हातावर हात धरुन बसेन? इथे खजिना आहे हे काय मला माहीत नाही.आता मी बघतोच इथला खजिना कसा सापडत नाही ते."
तो त्यांच्या कानाजवळ जाऊन मोठ्याने ओरडत होता. तो कसल्यातरी अनामिक शक्तीने भारल्यागत झाला होता. 

"म्हातारे माझं नुकसान करतेस होय? बघतोच आता तु कशी जगतेस ते" त्याच्या या आरडाओरड्यात निर्मलाबाईंच्या ह्रुदयाची धडपड कधी थांबली हे त्याला कळाले ही नाही. 

       जेव्हा त्या त्याचे ओरडणे ऐकायच्य़ा पलीकडे गेल्या आहेत हे त्याला कळालं तेव्हा , " निशा....... ए निशा, कौल लागला बघ. गेली एकदाची म्हातारी. आता तीचा तो थेरडा..साप बनुन बसलेला आहे ना..तो सुद्धा मरणार आता. अगदी शंभर टक्के मरणार. आता खजिना आपल्याला मिळणारच.. माझी खात्रीच आहे."

       तो धावतच तळघराकडे जाणाऱ्या जिन्याकडे पोहचला. दाणदाण पायऱ्या उतरतच तो तळघरात उतरला. अंधारातच त्याने चाचपडायला सुरवात केली. त्या भयाण अंधारात मुंगुसाचं गार शरीर त्याच्या हाताला लागलं. जराही न बिचकता तो त्याच जोमाने चाचपडत राहीला आणि त्याच्या हाताला तो गिळगिळीत स्पर्श झाला. तोच गार स्पर्श...दोन तिन दिवसांपुर्वी झालेला. पण निपचित पडलेला. कुमार तर हर्षवायुने वेडा व्हायचाच बाकी राहीला.


क्रमशः
(पुढील भाग - शेवट )

Friday, December 10, 2010

खजिना (भाग ७ ) - खजिन्याचा इतिहास


       वाड्यातल्या तळघरात त्याच्या आजोबांनी खजिना लपवला आहे अशी कुणकुण त्याने लहानपणापासुनच ऐकली होती. आजोबांनी त्यांच्या नंतरच्या काळात सावकारकी करुन बरीचसा पैसा, सोनं-नाणं जमवुन ठेवलं होतं. पण ते कुठे आहे हे कधिच कुणला सापडलं नव्हतं. शेवटी ते रहस्य आजोबांबरोबरच अचानक संपलं.

       कुमार लहान असताना त्याचे वडील तळघरात सारखं काही तरी शोधायचे हे त्याला कळायचं...पण काय शोधायचे हे त्याला कळत नव्हतं. त्याला फक्त तळघरातुन त्यांच्या गड्याने त्याच्या वडीलांचं शरीर उचलुन बाहेर आणलेलं आठवत होतं...आणि आठवत होता तो त्यांच्या तोंडातुन गळ्यावर ओघळणारा फेस.
       
        त्यांना नागाने दंश केला होता हे त्याला बराच मोठा झाल्यावर कळालं. पुढे पुढे तर त्याचे आजोबा नाग होऊन तळघरात लपलेत अशी कुणकुण सुद्धा त्याला ऐकु येऊ लागली. तो साधारण बारा-तेरा वर्षाचा असताना अशीच अजुन ऐक पाहीलेली घटना त्याच्या मनात घट्ट चिकटुन बसलेली होती. त्यांच्या गड्याचा देहसुद्धा त्याच्या वडीलांसारखाच तळघरातुन उचलुन आणला होता आणि त्याच्या तोंडातुन सुद्धा ओघळत होता तसाच फेस. तो नोकर सुद्धा खजिना शोधायचाच प्रयत्न करत होता हे त्याला आजीकडुन समजलं. तेव्हापासुन त्याने खजिन्याचं जे नाव टाकलं ते अगदी आता वाड्यात परत येईपर्यंत.

       पण आता पैश्याची अडचण तर आली होतीच आणि निशाला गप्पा-गप्पांतुन सांगितलेल्य़ा गोष्टींनी तिच्या मनावर फार विलक्षण परिणाम झाला होता. तीने त्याला तळघरात जायला एका परीने भागच पाडलं होतं. दोघे दबकत दबकत दोनच दिवसांपुर्वी आत उतरले होते. तिकडे जाऊन टॉर्चच्या प्रकाशात त्यांनी सगळीकडे पाहणी केली होती. कुठे कुठे उकरल्याच्य़ा खुणा तशाच टिकुन होत्य़ा. कुदळ-फावडं, घमेलं सगळं सामान तिथेच अस्ताव्यस्त पडलं होतं. कुबट अंधाऱ्या खोलीत गुदमरुन मरतो की काय असं वाटत असतानाच त्याच्या पायावरुन एक थंडगार स्पर्श वळवळत गेला आणि एकच शिरशिरी त्याच्या मस्तकापर्यंत गेली. ज्या स्थितीत आहे त्याच स्थितीत तो बाहेर पळाला होता.

       आपली काही आता आत जायची छाती नाही असं त्याने निशाला निक्षुन पुन्हा पुन्हा सांगीतले होतं आणि दुसऱ्याच दिवशी तीने त्याला उपाय सुचवला होता. आज तर ती तो उपाय घेवुनच आली होती.


क्रमशः
(पुढील भाग - कौल )

Tuesday, December 7, 2010

खजिना (भाग ६) - खजिना


"आता आपल्या हातात फक्त एकच गोष्ट आहे. तळघरातला खजाना. आता त्यावरच लक्ष केंद्रीत करायला हवंय.
"अरे पण तो तरी खरा आहे का? की तो सुद्धा तुझ्या प्रॉपर्टीसारखीच हुल?" निशाचा घाव त्याच्या वर्मावर लागला.
"आता आपल्याकडे दुसरा पर्याय तरी आहे का?" तो चिडून म्हणाला. " आपण दोघही पुरतं अडकलो आहोत..आणि आता इथे जर काही डबोलं निघालं तरच आपण वाचु शकु. थोडे पैसे एकदा हातात आले की त्या बापटाला थोडे चारुन प्रॉपर्टीचं काही करता येतं का ते सुद्धा पाहु."

थोडा वेळ तणाव तसाच टिकुन होता. शेवटी न राहवुन त्याने तिने आणलेलं बोचकं उचललं आणि तो तळघराकडे निघाला. अनिच्छेनेच निशासुद्धा त्याच्या मागे आली. बोचक्य़ातली वळवळ दोन क्षण थांबुन पुन्हा सुरु झाली. कुमार सावधपणे एक एक पायरी उतरुन तळघरात जाऊ लागला. 

"आई गं..." निशाच्य़ा तोंडून एक अस्पुट आवाज निघाला.
"का गं ? काय झालं?"
"काही नाही रे. हा तुमचा जुनाट जिना. याच्या दोन-तीन पायऱ्या खचल्यात इथे. पाय ठेवला आणि अगदी तोल गेल्यासारखच झालं. संभाळुन येत जा रे इथुन." 

तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करुन तो तसाच उतरत राहीला. त्याच्या डोळ्यांत फक्त खजिना चमकत होता.

क्रमशः
(पुढील भाग - खजिन्याचा इतिहास )

Saturday, December 4, 2010

खजिना (भाग ५) - निराशा



      त्यांच्या या वाक्याने कुमारला तर डोक्य़ावर कुऱ्हाडंच कोसळल्यासारखं झालं. तो काही प्रतिक्रिया देणार इतक्यात निशाचा आवाज त्याच्या कानावर पडला. आता फक्त तीच एक या जखमेवर फुंकर मारु शकेल या आशेने तो बाहेर आला. तो बाहेर जाताच निर्मलाबाई खिडकीतुन बाहेर पाहू लागल्या.अचानक त्यांना खोकल्याची उबळ सुरु झाली. कुमारने ऐकुनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष केलं..

निशाच्या हातात एक छोटसंच दहा बारा किलो वजनाचं पोतं होतं. ते तीने अलगद खाली ठेवले.. त्या पोत्यातली हालचाल त्याला दुरुनसुद्धा जाणवली.

"काम झालं का?" त्याने तिथुनच तीला विचारलं
"हो". झालं शेवटी. आता बघु कोण आपल्याला रोखतं ते?"
"आत्ता कोण रोखायचं बाकी राहीलय? आपली धाव सुरु होण्याआधीच तंगडं छाटलय"
"का रे? काय झालं? सगळं प्लॅन प्रमाणे चालु आहे ना आता."
"घंटा. म्हातारीने सगळी प्रॉपर्टी ट्रस्टच्या नावे केलीय . माझ्या हातात फक्त केळं दिलय थेरडीने. "

निर्मलाबाईंची उबळ पुन्हा उफाळुन आली. खोलीतुन बाहेर येण्याचं त्राण सुद्धा त्यांच्या अंगात उरलं नव्हतं.

"काय रे. यांना काय झालय आता? " निशाने हळु आवाजात विचारलं.
"कसलं काय? म्हातारीची नाटकं चाललीत. सालीचा गळा आवळून मारु का आजच?"
"आरे तीला मारुन आता काय मिळणार आहे ? तु फक्त नावाचा वारस. आता निदान आपल्या हातात जे आहे ते तरी करुया."

      प्रॉपर्टी कुमारच्या नावावर नाही हे ऐकुन निशाचा चेहरा तर पार पडला होता पण ती मोठ्या कष्टाने त्याला ते जाणवु न देण्याचा प्रयत्न करत होती. त्याची हिंमत टिकवुन ठेवणं तीच्या दृष्टीने त्या क्षणाला फार गरजेचं होतं. तरी तीची निराशा त्याला सुद्धा जाणवलीच.

"डार्लिंग तु नाराज होऊ नकोस. हा कुमार तुझ्यासाठी काहीही करु शकतो. भरोसा आहे ना माझ्यावर?
"हं" निशा काहीच न बोलता त्याला बिलगली.
"...पण बादशहा? त्याचं काय? त्याचा भरवसा नाही वाटत रे."
बादशहाची आठवण येताच त्याचं उसनं अवसान पुन्हा गळुन पडलं. कसं तरी धाडस करुन तो पुन्हा बोलला.

क्रमशः
(पुढील भाग - खजिना )

Wednesday, December 1, 2010

खजिना (भाग ४) -नकार


      दुसरा पर्यायच समोर दिसत नसल्यामुळे प्रॉपर्टी विकायची इच्छा नसतानाही तो गावी जायला तयार झाला होता. नाहीतरी वारस म्हणुन त्याचाच हक्क आहे हे त्याल निशाने पुर्णपणे पटवुन दिलं होतं. आणि त्यामुळेच त्याला सोबत म्हणुन निशादेखील त्याच्यासोबत गावी आली होती.

      एका जागेवर बसुन बसुन त्याचे डोळे आता तारवटले होते. दुपारपर्यंत येते असे सांगुन गेलेली निशा संध्याकाळचे सहा वाजत आले तरी घरी पोहचली नव्हती. तिचा मोबाईलही आऊट ऑफ कव्हरेज होता.

"कुमार..ऐ कुमार.." निर्मलाबाईंची हाक वाड्यातली शांतता चिरत गेली. हाक ऐकुन तो अनिच्छेनेच उठला.

"काय आहे?" थोद्याश्या तुसड्या स्वरातच त्याने दार ढकलत विचारले.
"अरे..आज मला जरा बरं वाटत नाहिये. कसलीतरी भीती वाटते आहे. छातीवर दडपण आल्यासारखं वाटतंय."
"मग ?? औषध देवु का? इथेच ठेवलीत. घ्या आणि झोपा निवांत. " त्याचा धीर सुटत होता पण त्याने मोठ्या मुश्कीलीने ताबा ठेवत औषधे दिली.

मधली पाच-दहा मिनिटे शांततेत गेली. त्याने न राहवुन बरेच दिवस सलत असलेल्या प्रश्नाला हात घालायला सुरवात केली.
"आजी, आता तुला चांगल्य़ा उपचारांची गरज आहे."
"हं"
"इथे खेड्यात मुश्कील आहे. हाकेला एक डॉक्टर देखील मिळत नाही."
"हं. बरोबर बोललास"
"आपण शहरात जाऊ. म्हणजे तुला कायम देखरेखीखाली ठेवता येईल."
"आणि तिथे राहणार कुठे? तिथे काय आपलं घर आहे?"
"काही अवघड नाही बघ. इकडची प्रॉपर्टी विकुन टाकायची आणि शहरात नविन घर घ्यायचं. नाहीतरी हा वाडा जुनाट झालाय."
" मग एक काम कर. तु आला आहेस तसाच परत जा. आत्ताच्या आत्ता. मी असेपर्यंत हा पुरेल मला एकटीला..पण हा वाडा मी कुणालाही विकु देणार नाही. "

      निर्मलाबाईंचा स्पष्ट नकार त्याला अपेक्षीत होताचं. त्याने तरीही हेका न सोडता पुन्हा विचारले.
" किती दिवस पण? किती दिवस? ..तु काय वरती घेऊन जाणार आहेस का? त्यापेक्षा मला तरी पैसे मिळु दे ना सुखाने."
त्य फक्त छद्मीपणे हसल्या. " मला माहीत होतं. कधि ना कधी तु रंग दाखवणार. पण तुझं तु बघुन घे बाबा. तुला वाटत असेल की माझ्या मागे तुझा मार्ग मोकळा होईल..पण ते चुकीचं आहे. या वाड्याची मालकी ट्रस्ट च्या नावे करुन ठेवलेली आहे. तुझ्या हातात तर इकडचा एक दगड सुद्धा विकायचा अधिकार नाही ठेवलेला रे मी."

क्रमशः
(पुढील भाग - निराशा)